पोस्ट्स

सायकलवारी अल्पपरिचित लेण्यांची

इमेज
भंडारा लेणी, माणचं एकुटवाणं विहार लेणं आणि फिरंगाईचं गुहामंदिर साधारणपणे लेणी म्हंटलं की बहुतांशी लोकांच्या डोळ्यासमोर येतात ती कार्ले, भाजे, अजिंठा, वेरूळ यांसारखी काही कलाकुसरयुक्त आणि बोटांवर मोजण्याइतकी लेणी. हवं तर हा लेख वाचण्याआधी, प्रयोग म्हणून करून पहा की, आपल्याला किती लेण्यांची नावं माहित आहेत? मी ही काही तुमच्याहून वेगळा नाही, काही वर्षांपूर्वी मलाही बोटांवर मोजण्याइतक्याच लेण्या ठाऊक होत्या. पण मागच्या काही वर्षात माहिती तंत्रज्ञानाच्या कृपेने, किल्ले आणि सह्याद्रीसारख्या आवडीच्या विषयांवर वाचन आणि श्रवण करता करता,  "प्राचीन आणि मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास" ह्याविषयीची उत्कंठा वाढत गेली आणि मग माझ्या बुद्धीला झेपेल तितक्या सखोलात शिरून माहिती मिळवण्याची सुरुवात झाली. त्यातलाच एक भाग, म्हणजेच  "लेणी"  ह्या विषयावर बरीचशी माहिती मिळत गेेली आणि लेण्यांबद्दलचे काही आकडेही समोर आले. तर, अभ्यासकांच्या मते संपूर्ण भारतात साधारण १६०० कोरीव लेणी आहेत, त्यातली १२०० (म्हणजे ७५%) लेणी ही महाराष्ट्रात आहेत, त्यातलीही ९०० लेणी ही पुणे जिल्यात आहेत आणि त्यातलीही ७

आणि स्मृतीस्थळ बोलतं झालं !!!

इमेज
अपरिचित वाघोली, फुलगावचा देखणा घाट आणि तुळापूर बोलू लागलं !! सवयीनं आठवड्यात एखाद्या दिवशी उषःप्रहरी उठावं आणि अंधारातच एकुटवाणं... नाही नाही !! रानभुलीसवे निघावं. (रानभुली कोण? विसरलात? मग आधी हे वाचा !!) कुठं जायचं ते रानभुलीला नेमकं ठाऊक असतं. अर्ध्या-पाऊण तासात ती मला, माझ्या आवडत्या नेमक्या टेकाडापाशी पोहचवते. आम्ही दोघंही मग अर्ध टेकाड चढून नेहमीच्या धोंड्यावर कोणाची तरी वाट पाहत बसतो. अजूनही अंधाराचंच साम्राज्य असतं. वारा दमून-भागून झोपलेला असला तरी त्याची उणीव हवेतला गारवा भरून काढत असतो. समोर भला मोठा काळसर निळा किंतानाचा पट (कॅनव्हास) क्षितीजापार पसरलेला असतो. त्यावर उगा कोण्या खोडकराने कुंचला फटकारून उडवलेल्या लहान-मोठ्या पांढुरक्या ठिपक्यांसारख्या चांदण्या लुकलुकत असतात. त्यांच्याशी स्पर्धा करू पाहणारे गावातले काही दिवे उगाच ऐट मिरवत असतात. आणि मग काही क्षणांतच त्याची चाहूल लागते. तो येतो... पांढरा शुभ्र ढगळ अंगरखा, तितकेच शुभ्र डोई-दाढीचे लांबसडक केस, बारीक पाणीदार डोळे, चेहर्यावर सुरकुत्यांचं जाळं, तिच गत हातांची आणि लांबसडक बोटांची !! वय किती असावं? माहीत नाही !! मानवाच

एक पठडीबाहेरचं प्रवासवर्णन

इमेज
तसं पाहिलं तर ह्या विषयावर काही लिहावं, असा काही माझा विचार नव्हता. नेहमीप्रमाणे मी, माझा एक सायकलानुभवच लिहायला बसलो होतो पण विचारांनी, मनाचा आणि हातांचा ताबा घेतला आणि सायकालानुभव बाजूला ठेऊन कागदावर वेगळीच आणि  अनपेक्षित अक्षरं उमटायला लागली. मग मीही स्वतःला विचारांच्या आधीन केलं आणि विचार हातांकडून काय लिहून घेतात ते निमूटपणे पाहत राहिलो. त्यातूनच ह्या एका वेगळ्याच प्रवासवर्णनाचा जन्म झाला. मागे एकदा, माझ्या एका लिखाणात मी म्हणालो होतो की, चराचर ह्या संकल्पनेत स्थान असलेल्या कुठल्याही अचल गोष्टीला   "निर्जीव" म्हणणं, मला तरी रुचत नाही. अगदी बालपणापासून ते आजपर्यंत माझ्या आयुष्यात आलेली कुठलीही अचल गोष्ट  (ठिकाण / निसर्गाचा घटक / वस्तू इ. )  ही "सजीव च " आहे असं मी मानत आलो आहे. त्यातल्याच काही गोष्टींशी तर अगदी (सजीवांपेक्षा काकणभर जास्तच) आपुलकीचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे " सायकल". सायकलला नुसतं "सायकल" असं म्हणण्यात, मला एक प्रकारचा निर्जीवपणा जाणवतो. मग अर्थातच, सायकलला  काही तरी नाव असावं आणि त्याच नावानं तिला संबोधावं

ओढाळ वासरू रानी आले फिरू

इमेज
मोरगिरी, संग्रामदुर्ग, कैलासगड, ढवळगडावरचा उल्कावर्षाव आणि कऱ्हेपठारावरचं प्राचीन शिल्पवैभव असं बरंच काही !!! ओढाळ वासरू रानी आले फिरू, कळपाचा घेरू सोडुनिया कानांमध्ये वारे भरूनिया न्यारे, फेर धरी फिरे रानोमाळ मोकाट मोकाट, अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे तुम्ही म्हणाल आता हे काय नवीन? पुन्हा पाचवीचा अभ्यास चालू केला की काय? लेखनाची सुरुवात पद्याने करायचा नवीन छंद जडलाय का? वगैरे वगैरे... पण खरंच, मला २०२० चं वर्ष, सरता सरता जे काही आनंद देऊन गेलं त्याचा लेखन-प्रपंच मांडायला घेतला आणि कवी अनिलांचं अवखळ वासरू डोळ्यासमोर उड्या मारायला लागलं. पुणे जिल्ह्यात मला ज्ञात असलेले उणे-अधिक बत्तीस तरी गिरीदुर्ग आहेत. त्यातले तीन दुर्ग (मोरगिरी, कैलासगड आणि ढवळगड) वगळले तर बाकी दुर्गांना आजपर्यंत किमान एकदा तरी भेट देऊन झाली आहे. पण उर्वरित तीन दुर्ग पाहण्याचा योग काही येत नव्हता. ठरवल्याप्रमाणे २०२० च्या सुरुवातीला प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून नगर जिल्ह्यातले तीन दुर्ग (मांजरसुभा, नगरचा भुईकोट व जामगावचा भुईकोट) आणि नगरमधील काही वास्तू पाहून आलो, पण वेध लागले होते ते पुणे जिल्ह्यातले उरलेले ती